0
7

रायगड (प्रतिनिधी) : मंत्रालयाच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, पुढील ३ ते ४ तासांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामानातील या संभाव्य बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. विशेषतः सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच दरडग्रस्त किंवा पूरप्रवण भागांमध्ये रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कमी-जास्त प्रमाणात सुरू असून, आगामी काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहणे, अनावश्यक प्रवास टाळणे आणि हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here